गोरगरीब जनतेच्या न्याय हक्कासाठी लोकशाही धडक मोर्चासोबत या ; मनोज गवळी


मालेगाव (अजहर शेख) : गोरगरिब जनतेच्या न्याय हक्कासाठी सदैव पाठपुरावा करत त्यांना न्याय मिळवून देण्यापर्यंत लढणाऱ्या लोकशाही धडक मोर्चा या सामाजिक संघटनेच्या पाठीशी जनतेने सदैव सहभागी होत आपल्या भागातील समस्या सोडून घ्याव्या असे आव्हान सामाजिक कार्यकर्ते मनोज गवळी यांनी केले लोकशाही धडक मोर्चा वनपट टिंगरी या शाखेच्या उद्घाटन वेळी ते बोलत होते  तालुक्यातील वनपट टिंगरी येथे लोकशाही धडक मोर्चाच्या पहिल्या शाखेचे उध्दाटन मनोज गवळी व  विष्णु सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते यावेळी त्यांनी संस्थापक शेखर पगार यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे रहा कोणत्याही परिस्थितीत मागे हटू नका आपल्याला आपल्या न्याय हक्कासाठी लढणारा एकमेव माणूस म्हणजे शेखर पगार आहे असे मत व्यक्त केले. यावेळी शाखा अध्यक्ष,बापू माळी, संस्थापक अध्यक्ष शेखर पगार,मा.सरपंच सुवर्णा पगार,विष्णु सोनवणे,शरद शिंदे, विशाल शिंदे ,भुषण कचवे, दादा जाधव,योगेश गर्दे,केदा खैरनार, ज्ञानेश्वर शिंदे,पुंजाराम माळी,भरत गांगुर्डे, राकेश गांगुर्डे,भरत सोनवणे,किरण वाबळे, आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते . या कार्यक्रमास महिलांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!