मनमाडच्या तरुणांने रक्ताने पत्र लिहुन केले फडणवीसांना भावानिक अवाहन…!
मनमाडच्या तरुणांने रक्ताने पत्र लिहुन केले फडणवीसांना भावानिक अवाहन…!
मनमाड(अजहर शेख):- नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला यात भारतीय जनता पक्षाला पाहिजे तसे यश मिळाले नाही यामुळे या पराभवाची नैतिक जबाबदारी घेऊन राज्याचे भाजपचे प्रमुख नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला पदमुक्त करा अशी मागणी दिल्लीच्या नेत्यांना केली आहे यामुळे भाजपात खळबळ उडाली असुन मनमाडच्या भाजपा युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष शुभम बापू गायकवाड या तरुणांने स्वतःच्या रक्ताने देवेंद्र फडणवीस यांना भावनिक पत्र लिहुन राज्याला तुमची गरज आहे तुम्ही राजीनामा देऊ नका असे आवाहन केळवे आहे या पत्राची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.


लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने देशात 400 सो पार तर राज्यात 45 प्लसचा नारा दिला होता व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपाचे राज्याचे प्रमुख नेते म्हणून काम करत होते त्यांच्याच नेतृत्वाखाली भाजपाने निवडणूक लढली मात्र यात भाजपाला सपशेल अपयश मिळाले या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदातुन मुक्त करण्याची विनंती पक्षश्रेष्ठीकडे केली आहे.आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा व महाराष्ट्राला मार्गदर्शन करावे व तो माघे घ्यावा यासाठी भाजपा युवामोर्चा जिल्हाउपाध्यक्ष शुभम(बापु)गायकवाड यांनी आपल्या रक्ताने पत्र लिहून पुर्नविचार करावा अशी विनंती केली आहे.याच पत्रात नांदगावं तालुक्याचे आमदार सुहास कांदे यांनी प्रामाणिक साथ देऊन युतीधर्म पाळून लाख्यांच्या वर लीड दिला त्याबद्दल त्यांचेदेखील आभार मानण्यात आले आहे