जयभीम लाल सलामच्या जयघोषात कॉ रणजित परदेशी यांना अखेरचा निरोप…
जयभीम लाल सलामच्या जयघोषात कॉ रणजित परदेशी यांना अखेरचा निरोप…
मालेगाव(अर्जुन बागुल):- महाराष्ट्रातील जेष्ठ पुरोगामी कार्यकर्ते, प्रगत विचारवंत समाजशास्त्रज्ञ, मार्क्सवाद-फुले-आंबेडकरवाद चे अभ्यासक,व भाष्यकार प्रा.रणजित परदेशी सर यांचे ३/३/२०२४रोजी रात्री दु:खद निधन झाले.
महाराष्ट्रातील जातीव्यवस्था अंत चळवळ आणि प्रबोधनामध्ये प्रा.रणजित परदेशी यांचे अतुलनीय योगदान राहिले आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळ, एक गाव एक पाणवठा, महात्मा फुले बदनामीचा विरोध, मंडल आयोग समर्थन चळवळ, आणीबाणी विरोध, शिक्षण अधिकार आंदोलन, शेतमाल भाव आंदोलन या सारख्या असंख्य चळवळ आणि आंदोलनाला मार्गदर्शन करण्याचे काम गेली ४० वर्ष पेक्षा जास्त काळ प्रा.रणजित परदेशी यांनी केले आहे. याच बरोबर दलित-आदिवासी-ग्रामीण संयुक्त साहित्य सभा, विद्रोही सांस्कृतिक चळवळ अशा कला साहित्य आणि सांस्कृतिक आंदोलनांना संघटित करण्यामागे रणजित परदेशी यांचे योगदान महत्त्वपुर्ण राहिले आहे. याच बरोबर समाजशास्त्रीय संशोधनात सहभागी संशोधन पद्धती विकसित करण्याचे एक महत्त्वपूर्ण काम प्रा. परदेशी यांनी केले आहे.
काळा मारुती रोड, येवला येथील प्रा.रणजित परदेशी यांचे निवासस्थान हे पुरोगामी कार्यकर्ते घडविणारा कारखाना म्हणून महाराष्ट्र भर ओळख निर्माण झाली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले शेकडो कार्यकर्ते आज राष्ट्र सेवा दल, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष, दलित-आदिवाशी-ग्रामिण संयुक्त महासभा, सत्यशोधक विद्यार्थी संघटना, सत्यशोधक जन आंदोलन, सत्यशोधक कष्टकरी महिला सभा, सत्यशोधक शेतकरी सभा, सत्यशोधक युवक आघाडी, सत्यशोधक ग्रामीण सभा, विद्रोही सांस्कृतिक चळवळ, शेतकरी संघटना, डेमोक्रॅटिक पक्ष आदी संघटना, पक्ष, आघाड्या मध्ये कार्यरत आहेत.
दिवंगत कॉम्रेड रणजित परदेशी सर यांना अखेरचा लाल सलाम जयभीम सत्य की जय हो!